

यंदाच्या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण १७ फेब्रुवारी रोजी लागणार आहे. फाल्गुन महिन्यातील अमावस्येला सूर्य ग्रहण लागणार आहे. मुख्य म्हणजे हे कंकणाकृती सूर्यग्रहण असणार आहे. हे ग्रहण खासकरून अंटार्क्टिका, आफ्रिकेचे काही भाग आणि दक्षिण अटलांटिक महासागराच्या भागात दिसणार आहे.
हे ग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे सुतक काळ वैध राहणार नाही. १७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३:२६ वाजता हे ग्रहण सुरू होणार आहे आणि रात्री ८ वाजता संपणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशी आणि नक्षत्रांवर या ग्रहणाचा परिणाम होईल.
२०२६ चे पहिलं सूर्यग्रहण कुंभ आणि शतभिषा नक्षत्रात होणार आहे, त्यामुळे या ग्रहणाचा या राशी आणि नक्षत्राशी संबंधित लोकांवर सर्वात जास्त परिणाम होईल. या लोकांना त्यांच्या आरोग्याबाबत आणि आर्थिक बाबींबाबत सावधगिरी बाळगावी लागणार आहे. या काळात तुमचे काही निर्णय चुकीचे ठरण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलीये. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेताना तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागू शकते.
या राशींच्या वैवाहिक जीवनात समस्या येऊ शकतात. तुमच्या रिलेशनशिपमध्येही अडचणी येणार आहेत.
घरच्या सुख-सुविधांमध्ये बाधा येण्याची शक्यता असते. तुमच्या कुटुंबातील व्यक्तींची तब्येत बिघडू शकते.
मानसिक अधिक असणार आहे. तुमची काम अपूर्ण राहू शकतात.
ग्रहणाच्या काळात भगवान सूर्याला समर्पित मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करा. यामुळे ग्रहणाचे नकारात्मक परिणाम टाळण्यास मदत होते. शिवाय ग्रहण संपल्यानंतर स्नान करा आणि दान करा. ग्रहण काळात स्वयंपाक किंवा खाणं टाळा. गर्भवती महिलांनी या काळात तीक्ष्ण वस्तू वापरणं टाळलं पाहिजे. कारण याचा गर्भातील बाळावर हानिकारक परिणाम होऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.