

सध्या हार्ट अटॅक आणि हृदयाच्या समस्यांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. आजकाल केवळ प्रौढ व्यक्ती नाही तर तरूणांमध्येही हार्ट अटॅकचं प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळतंय. भारतात जवळपास ९९ टक्के हार्ट अटॅक, स्ट्रोक तसंच हृदय निकामी होणं यांसारख्या घटना होण्यामागे एक किंवा अधिक गोष्टी कारणीभूत असतात.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे घटक धोकादायक असून ते वेळेत दिसून येत नाही. त्यामुळे या समस्येची छोटी छोटी लक्षणंही वेळेत ओळखणं गरजेचं असतं. याची लक्षणं काय दिसून येतात ते जाणून घेऊया.
हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर आणि धमन्यांवर जास्त प्रमाणात दाब पडल्याने हृदयाच्या वॉलला धोका निर्माण होतो. यामध्ये प्लाक जमा होऊ लागतो. यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते.
जास्त प्रमाणातील LDL, कमी HDL किंवा असामान्य लिपिड प्रोफाइल असलेल्या व्यक्तींच्या शरीरात योग्य पद्धतीने रक्ताभिसरण होत नाही. त्यामुळे गाठ तयार होण्याची शक्यता वाढते. अशावेळी हृदयाच्या स्नायूपर्यंत रक्त पोहोचत नाही.
ज्या व्यक्तींना मधुमेह आहे किंवा रक्तात साखरेची पातळी जास्त आहे त्यांच्या रक्तवाहिन्यावर परिणाम होतो. यामुळे हार्ट अटॅक येण्याचाही धोका वाढतो.
धुम्रपान टाळल्याने हार्ट अटॅकचा धोकाही टाळता येतो. अनेक लोकं त्याकडे दुर्लक्ष करतात. तर काही जणं जोपर्यंत गंभीर नुससा होत नाही तोपर्यंत लक्ष देत नाहीत.
वारंवार थकवा जाणवणं
छातीत अस्वस्थता किंवा दडपण
हात, मान किंवा पाठीमध्ये होणाऱ्या वेदना
श्वास घेण्यास त्रास होणं
मळमळ किंवा जास्त घाम येणं
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.