
Parenting Tips : अनेकदा आपण आपल्या अनेक गुणांमुळे ओळखले जातो. आपल्या वागण्या व बोलण्यामुळे अनेक गोष्टीवर त्याचा प्रभाव पडतो. असे म्हटले जाते की, चांगले संस्कार हे आपले व्यक्तीमत्त्व दर्शविते. त्यामुळे आपल्याला खरी ओळख मिळते.
आचार्य चाणक्य (Chanakya) म्हणतात की, आदर्श व्यक्ती ही तिच्या संस्कारामुळे तर ओळखली जातेच पण त्याच्या वागणूकीमुळे देखील ओळखले जातात. मानवांच्या सुखी जीवनासाठी चाणक्याने पत्नी, मुले व मानवी जीवनावर प्रकाश टाकला आहे. पालकांचे चांगले संस्कार हे वाईट काळात मुलांमध्ये दिसून येतात. चाणक्यांच्या श्लोकांतून जाणून घेऊया आदर्श मुलाचे (Child) गुण कोणते
वसितां तद्वानम् सर्वं सोनुत्रेण कुलम् यथा ॥
चाणक्य म्हणतात की, एकच झाड सुंदर फुलांनी फुलून संपूर्ण वन सुगंधाने सुगंधित करते, त्याचप्रमाणे कुटुंबातील एक मुल संपूर्ण कुळाचे नाव उंचावतो. आई-वडिलांच्या वृद्धापकाळाची काळजी (Care) घेण्यासाठी एक सद्गुणी मूल पुरेसे आहे.
1. अशा मुलामुळे कुटुंबाचा नाश होतो
चाणक्याच्या मते, ज्यांना कुटुंबाच्या वाढीसाठी आणि समृद्धीसाठी एकापेक्षा जास्त अपत्ये हवी असतात, त्यांनी आपल्या विचारांवर पुनर्विचार करावा. चाणक्यच्या मते, जे मूल आपल्या आई-वडिलांशी कडू बोलते, त्यांना दुखावते, स्वतःच्या फायद्यासाठी कुटुंबाचे नुकसान करण्याचा विचार करते, त्याच्यामुळे कुटुंबाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
2. एकच अपत्याने कुटुंब सुखी
दु:ख आणि निराशा देणार्या पुत्रांचा काय उपयोग. यापेक्षा एकच मुल चांगले आहे. त्याला योग्य ते संस्कार देऊन संपूर्ण कुटुंबाला आनंद, शांती आणि आधार देऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.