
Friendship Tips : मैत्रीच नातं हे अनेक नात्यांपेक्षा सुंदर व वेगळ असत. रक्ताच नसल तरी विश्वासावर हे नातं अधिक काळ टिकत. आपल्या चांगल्या व वाईट काळात ती सतत सोबत असते ती मैत्री.
परंतु, कधी कधी मैत्री (Friends) करताना आपण अनेक चुका करतो. समोरच्याला समजून न घेता आपण त्यांच्याशी मैत्री करतो. त्यामुळे मैत्रीत असे देखील चेहरे असतात जे खोटे मुखवटे घालून फिरतात. आचार्य चाणक्य (Chanakya) म्हणतात की, आपल्या चांगल्या वाईट काळात आपण लोकांना ओळखायला चुकतो त्यामुळे आपण अनेक अडचणीत सापडतो.
चाणक्य म्हणतात की, आपल्या फ्रेंड लिस्टमध्ये आपण अशा काही माणसांना जोडतो. ज्यामुळे आपल्याला अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. चाणक्य नीतीमध्ये अशाच काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्यात कोणत्या व्यक्तींशी मैत्री करू नये. जाणून घेऊया त्याबद्दल
1. चाणक्य नीतीनुसार मद्यपान करणाऱ्यांपासून दूर राहावे. असे मित्र आपल्याला वाईट संगतीत पुढे नेण्यास अव्वल असतात. नशेमध्ये अशी माणसं आपली प्रतिष्ठा विसरतो. त्यामुळे अशा माणासांपासून लांब राहाणे चांगले.
2. चाणक्य म्हणतात की, कवीशी मैत्री करताना जरा जपून कराला. त्यांचे विचार किंवा मुद्दे मांडण्याची पद्धत ही वेगळी असते. त्यामुळे यांच्याशी शत्रुत्व किंवा मैत्री करताना विचारपूर्वक करा
3. माणसाने नेहमी विचार करूनच स्वार्थी माणसाशी मैत्री करावी. एक स्वार्थी माणूस नेहमी स्वतःबद्दल विचार करतो. अशा परिस्थितीत या लोकांशी जपून मैत्री करा.
4. सतत चुकीचा किंवा वाईट विचार करणाऱ्या माणसांपासून दूर राहायला हवे. जे लोक इतरांसाठी वाईट विचार करतात किंवा फक्त स्वतःसाठी चांगले विचार करतात, असे लोक भविष्यात तुमचे नुकसान देखील करू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.