
Parenting Tips : प्रत्येक पालकांना असे वाटते की, आपल्या मुलांने संस्कारी बनावे ज्याचे पालन करुन ते अनेक यशाची पायरी चढू शकतात. यासाठी त्यांच्यावर योग्य वेळी योग्य ते संस्कार देखील करने गरजेचे आहे.
चाणक्य (Chanakya) म्हणतात की, आपल्याला मुलांला आयुष्यात यशस्वी बनवण्यासाठी पालकांनी देखील योग्य ती मेहनत घेणे देखील गरजेची आहे. जीवनात अनेकदा अपयशांना सामोरे जावे लागते. असे म्हटले की, मुलांचा पाया चांगला असेल तर त्याचे भविष्यही उज्ज्वल असते. त्यासाठी चाणक्यांनी पालकांना (Parents) मोलाचा सल्ला दिला आहे जाणून घेऊया त्याबद्दल
1. घरात भांडण नको
अनेकदा पती-पत्नी मुलांसमोर भांडतात. त्यामुळे मुलांच्या आजूबाजूचे वातावरण खराब होते. असं म्हणतात की मुलं (Child) त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणातूनच सर्वाधिक शिकतात. त्यानुसार ते कॉपी करुन वागण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही घरातील वातावरण खराब ठेवले, जास्त भांडण केले तर त्याचा तुमच्या मुलावर वाईट परिणाम होतो. येणाऱ्या भविष्यात तुमची मुलंही ही आक्रमकता अंगीकारतील.
2. चांगल्या गोष्टी शिकवा
पालक इतरांशी ज्या प्रकारे वागतात, त्यांची मुलेही तेच आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या घरात चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी असतील तर त्याचा तुमच्या मुलांवरही सकारात्मक परिणाम होतो.
3. प्रोत्साहन द्या
प्रत्येक मुलाची क्षमता वेगवेगळी असते, अशा परिस्थितीत त्याची तुलना इतर मुलाशी केली तर त्याच्या आत संकोच निर्माण होऊ लागतो. पालकांनी त्यांची ध्येये आणि इच्छा मुलांवर लादू नये. हे त्यांना कधीही यशस्वी होणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.