
Child Care Tips : बदलत्या काळानुसार पालकांचे विचार ही बदले आहेत. पालक आणि मुलांच नातं हे अतूट असते. हल्लीच्या पालकांचे आणि मुलांचे एकमेकांसोबत मैत्रीचे अतूट नाते तयार झाले खरे पण मुलांना ते कितपत आवडते याचा काही नेम नाही.
आचार्य चाणक्य (Chanakya) म्हणतात की, पालक अशा अनेक चुका करतात, ज्या मुलासाठी आणि पालकांसाठी वेदनादायक असतात. या सुधारल्या पाहिजेत. त्यामुळे मुलाचे भविष्य उज्ज्वल होईल. त्याचबरोबर आई-वडीलही आनंदी जीवन जगतात. याशिवाय संपत्तीतही वाढ होते. तुम्हालाही तुमच्या मुलाला यशस्वी (Success) व्यक्ती बनवायचे असेल तर या 4 चुका करू नका. जाणून घेऊया-
1. जे पालक आपल्या पाल्याला संस्कार देत नाहीत. ते मुलाला सुसंस्कृत आणि सभ्य बनवत नाहीत. ते स्वतःच्या मुलाचे शत्रू आहेत. यामुळे मुलाचे भवितव्य तर बिघडतेच, शिवाय पालकांचा जीवही धोक्यात येतो. मुले चुकीच्या मार्गावर चालायला लागतात. यामुळे पालकांची सामाजिक चेष्टा होते. यासोबतच मुलेही चुकीच्या कृत्यांसाठी शिक्षेचा भाग बनतात.
2. मुलांना शिक्षण देणे हे पालकांचे कर्तव्य आहे. यासाठी मुलांना शिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास मुले चांगल्या शिक्षणापासून दूर राहू शकतात. जे पालक आपल्या मुलांना उच्च शिक्षण देत नाहीत ते स्वत:च्या मुलाचे शत्रू (Enemy) आहेत. उच्च शिक्षणाअभावी मुलाला जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो.
3. चाणक्य म्हणतात की मुलांना अति लाडाने वेड करु नका. पालकांनी ही त्यांच्या गरेजनुसार त्यांना कसे वागावे, परिस्थिती कशी सांभाळावी हे शिकवायला हवे. त्याचे सगळेच हट्ट पुरवू नका. त्यांना ज्या गोष्टीची गरज आहे ते ओळखूनच त्यांना ते द्या. अन्यथा मुले अति लाडाने हट्टी बनतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.