Chanakya Niti On Saving Money: सतत हातात खेळता राहिल पैसाच पैसा ! फक्त चाणक्यांच्या या गोष्टींचे लक्षात ठेवा

Saving Tips : चाणक्यच्या मते, पैसा मिळवण्यासाठी जेवढे आवश्यक आहे, तेवढेच ते खर्च करणेही महत्त्वाचे आहे.
Chanakya Niti
Chanakya NitiSaam Tv

Money Tips : चाणक्यांनी खर्च, उपभोग आणि गुंतवणूक या विषयावर आपले विचार तपशीलवार मांडले आहेत. चाणक्यच्या मते, पैसा मिळवण्यासाठी जेवढे आवश्यक आहे, तेवढेच ते खर्च करणेही महत्त्वाचे आहे.

परंतु चाणक्यांच्या धोरणात पैशाच्या (Money) बाबतीत माणसांने केव्हा आणि कुठे सावध राहावे, हे देखील सांगितले आहे. त्यांचा अवलंब करून तुम्ही केवळ आर्थिकदृष्ट्या मजबूत बनू शकत नाही, तर तुम्ही एक यशस्वी (Success) व्यक्ती देखील बनू शकता.

Chanakya Niti
Chanakya Niti On Relationship: सुंदर पत्नीदेखील धोक्याची घंटा ! चाणक्यांनी दिला कानमंत्र

चाणक्य म्हणतात की, जर एखाद्या व्यक्तीला श्रीमंत व्हायचे असेल तर त्याला पैशाचा खर्च आणि ते वाचवण्याचे मार्ग माहित असायला हवे. आवश्यकतेपेक्षा जास्त पैसे वाचवणे अयोग्य आहे. चाणक्‍याने उदाहरण दिले आहे की, तलावाचे पाणी जसे एका जागी जास्त वेळ राहिल्यास ते कुजते. त्याचप्रमाणे पैसे जास्त काळ ठेवल्याने त्याचे महत्त्वही कमी होते. दान हा पैसा खर्च करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. दानाने पैसा कमी होत नाही तर दुप्पट होतो. योग्य गोष्टींमध्ये पैसा गुंतवावा. हे संपत्तीच्या संरक्षणासारखेच आहे.

1. सुरक्षित भविष्यासाठी पैसे वाचवा

चाणक्य म्हणतात की, पैशाचा चांगला वापर केला पाहिजे, परंतु सुरक्षित भविष्यासाठी अनावश्यक खर्चाला आळा घालणे खूप महत्वाचे आहे. कमाईचा काही भाग दान करा तसेच पैसे गुंतवणुकीसाठी वापरा. आजच्या काळाबद्दल सांगायचे तर, विमा, आरोग्य (Health) योजना, शिक्षण योजनांमध्ये गुंतवणूक करा, ते केवळ कठीण काळात तुमची साथ देत नाहीत तर तुमचे भविष्य देखील सुधारतील.

Chanakya Niti
Chanakya Niti : तुम्हालाही यशाच्या शिखरावर पोहोचायचे आहे ? वेळीच 'या' 3 लोकांपासून व्हा सावध !

2. पैशांचा आणि अहंकाराचा लोभ बाळगू नका

पैशाच्या लोभापायी माणूस चुकीच्या मार्गावर जातो. पैसा मिळवण्यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार होतो आणि कधीच आनंदी होऊ शकत नाही. चाणक्य म्हणतो की पैसा आला की गर्व करू नका. जे आपली संपत्ती दाखवतात ते गरिबीच्या उंबरठ्यावर येतात.

3. ही एक चूक राजाला रंक बनवते

पैसा नेहमी योग्य मार्गाने मिळवावा, कारण चुकीच्या पद्धतीने कमावलेला पैसा काही काळासाठीच आधार देतो. चाणक्याच्या मते, अनैतिक पद्धतीने केलेली कमाई लवकर नष्ट होते, अशा पैशाचे आयुष्य फक्त दहा वर्षे असते. या 10 वर्षांतही माणसाची संपत्ती पाण्यासारखी वाहत असते. एक ना एक कामात अनावश्यक खर्च करावा लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com