Home Buying Tips : मुंबईसारख्या शहरात घर घेणे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न आहे. आपलेही घर असावे असे प्रत्येकाला वाटते. परंतु, आपण अनेकदा घर घेताना चुका करतो. ज्यामुळे पुढे जाऊन आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येते.
आचार्य चाणक्य म्हणतात की, घर विकत घेताना व घर बांधताना काही विशेष गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे. ते म्हणतात मनुष्य या ठिकाणी घर घेऊन देखील नये व बांधून देखील नये. जाणून घेऊया ते कोणते ठिकाण आहे व चाणक्य असे का म्हणाले...
2. आचार्य चाणक्य यांच्या मते, अशा ठिकाणी घर बांधू नये, जेथे लोकांच्या लज्जेची भीती नसेल. जिथे सामाजिक जाण आधी असते, तिथेच स्थायिक होणे उत्तम मानले जाते.
3. आचार्य चाणक्य सांगतात की, घर अशा ठिकाणी वसवले पाहिजे, जिथे परोपकारी लोक राहतात आणि त्यांच्यात त्यागाची भावना असते. अशा ठिकाणी घर उभारल्याने तुमच्यातही परोपकाराची भावना निर्माण होते.
4. कायद्याचा (Law) धाक नसलेल्या ठिकाणी स्थायिक होण्यापासून नेहमी दूर राहिले पाहिजे. त्याऐवजी, अशी जागा निवडा जिथे लोक कायदा आणि सुव्यवस्थेचे पूर्णपणे पालन करतात.
5. घर नेहमी अशा ठिकाणी असले पाहिजे, जिथे लोक दान करत राहतात. हिंदू धर्मात दान करणे हे अत्यंत पुण्यपूर्ण कार्य मानले जाते. त्यामुळे मनुष्याच्या सर्व पापांचा नाश होतो.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.