Shiv Puja Niyam: शंकराच्या मंदिरातून परत येताना 'या' चुका करणं टाळा; पुजेचं फळ मिळणार नाही

Rules for Mahadev puja: भगवान शंकराची आराधना आणि त्यांच्या मंदिरात दर्शन घेणे हे अत्यंत पवित्र मानले जाते. भाविक मोठ्या श्रद्धेने मंदिरात जाऊन पूजा-अर्चा करतात, परंतु मंदिरातील पूजेनंतर परत येताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक असते.
Rules for Mahadev puja
Rules for Mahadev pujasaam tv
Published On

हिंदू धर्मात देवाच्या पुजेला फार महत्त्व देण्यात आलेलं आहे. रोज सकाळी स्नान करून देवपूजा करणं, मंदिरात जाऊन दर्शन घेणं आणि मनःपूर्वक प्रार्थना करणं हे नित्यकर्म मानलं जातं. मंदिरात गेल्यानं तुमच्या मनाला शांती मिळते. या साध्या वाटणाऱ्या कृतीमुळे अध्यात्मिक ऊर्जा प्राप्त होते आणि मानसिक स्थैर्यही वाढतं.

श्रावण महिन्यात शिवाची पुजा

सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि या महिन्यात महादेवाची पूजा करण्याचं विशेष महत्त्व आहे. श्रावणात असं मानलं जातं की, भगवान शिव पृथ्वीवर वास करतात, त्यामुळे या काळात शिवमंदिरांमध्ये भाविकांची विशेष गर्दी पाहायला मिळते. लोक शिवलिंगावर जलाभिषेक, बेलपत्र अर्पण, अभिषेक आणि महादेवाचं नामस्मरण करतात.

शिवपुराणासह अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये असं सांगितलं गेलंय आहे की, भगवान शंकर खूप लवकर प्रसन्न होणारे देव आहेत. पण ते तितक्याच लवकर रागवतात देखील. त्यामुळे त्यांच्या पूजेनंतर काही गोष्टींपासून आपण विशेषतः दूर राहिलं पाहिजे.

अनेकदा आपण मंदिरातून घरी येताना असं समजतो की मनापासून पूजा केल्याने पुण्य मिळालंच. पण खरं म्हणजे, पूजेनंतर मंदिरातून घरी परतताना काही नियम पाळणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मंदिरातून घरी येताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत ते आपण जाणून घेऊया.

Rules for Mahadev puja
Shani Budh Vakri: ५०० वर्षांनी शनी-बुध ग्रह होणार वक्री; 'या' राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम

मंदिरातून रिकामा लोटा घेऊन येणं टाळा

शिवपूजेमध्ये जल अर्पण करणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे अनेकजण लोट्यामध्ये पाणी घेऊन मंदिरात जातात. पूजा झाल्यावर लोटा रिकामा झालेला असतो आणि आपण तो तसाच घरी घेऊन येतो. पण हे चुकीचं आहे. असं मानलं जातं की मंदिरातून रिकामा लोटा घेऊन येणं योग्य नसतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही पूजेसाठी लोटा घेऊन जाता, तेव्हा थोडं पाणी, अक्षता किंवा फुलं त्यात ठेवून घरी आणा.

मंदिरातून येताच लगेच पाय धुणं टाळा

मंदिर हे एक पवित्र जागा असतं. तिथं सकारात्मक ऊर्जा असते, जी आपल्या शरीरात शिरते. अनेक लोक मंदिरातून आल्यानंतर ताबडतोब पाय धुतात. पण हे टाळावं. ही सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरात जास्त वेळ राहावी यासाठी किमान काही वेळ तरी पाय धुणं थांबवावं.

पूजेसाठी आणलेली सामग्री अडगळीच्या जागी टाकू नका

मंदिरातून आल्यावर पूजेसाठी आणलेली फुलं, प्रसाद, अक्षता, बेलपत्र किंवा जल घरात कुठेही टाकणं चुकीचं आहे. घरात येताच पहिल्यांदा ही पूजा सामग्री स्वच्छ आणि पवित्र जागी ठेवली पाहिजे. प्रसाद सर्व कुटुंबीयांना वाटावा. उरलेल्या फुलांना झाडाच्या मुळाशी टाकावं.

Rules for Mahadev puja
Dashank Yog: 30 वर्षांनंतर न्यायाधीश शनी बनवणार अद्भुत योग; 'या' राशींना होणार धनलाभ

मंदिरातून परतताना घंटा वाजवू नका

मंदिरात प्रवेश करताना घंटा वाजवण्याची परंपरा आहे. असं केल्याने आपल्या येण्याची सूचना देवाला दिली जाते, असं मानलं जातं. पण मंदिरातून परतताना घंटा वाजवणं चुकीचं मानलं जातं. अनेकजण नकळत ही चूक करतात. कारण घंटा हे देवाला आपल्या उपस्थितीचं निदर्शक आहे, आणि देवदर्शनानंतर, परतीच्या वेळी त्याची गरज नसते.

Rules for Mahadev puja
Kamika Ekadashi 2025: कामिका एकादशीला आज घरामध्ये 'या'ठिकाणी लावा पणती; नकारात्मक उर्जा असल्यास निघून जाईल

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com