विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लाडकी बहिण योजना’ लागू केली होती.
या योजनेनंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगलं यश मिळालं. याचं कारण म्हणजे आता महिलांना या योजनेअंतर्गत 2100 रुपयांची प्रतिक्षा आहे.
महायुतीचे सरकार पुन्हा राज्यात आल्यास महिलांना दरमहिन्याला 2100 रुपये देण्याची घोषणा करण्यात आलेली. मात्र आता सरकार काही निकषांच्या आधारे पडताळणी करणार असून त्यानंतरच महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहेत.
हे निकष काय आहेत यावर एक नजर टाकूयात. पाहूयात नेमक्या कोणत्या निकषांची पडताळणी होणार आहे.
योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांचे पती आयकर भरतात का? याची तपासणी केली जाणार आहे.
त्याचप्रमाणे लाभार्थी लाडक्या बहिणीच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे का? हे पाहिलं जाईल.
एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का? याचीही तपासणी केली जाणार आहे. कारण एकाच कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
परितक्त्या, विधवा, निराधार योजनेचा लाभ घेत असतानाही लाडकी बहीण म्हणून लाभ घेतात का? हे तपासण्यात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.