
नवीन नियमांनुसार नियोक्त्यांनी महिना संपल्यानंतर ७ दिवसांच्या आत कर्मचाऱ्यांचा पगार जमा करणं गरजेचं आहे. यामुळे पगार उशिरा मिळण्याच्या समस्येत मोठी घट होण्याची अपेक्षा आहे.
रोजंदारीवर काम करणाऱ्यांना शिफ्ट संपताच सॅलरी द्यावे लागेल. साप्ताहिक कर्मचाऱ्यांना सुट्टीपूर्वी, तर पंधरवड्याच्या कर्मचाऱ्यांना २ दिवसांच्या आत पगार मिळणं अनिवार्य असेल.
राजीनामा दिल्यानंतर किंवा नोकरी संपल्यानंतर कंपनीने २ कामकाजाच्या दिवसांत Full & Final सेटलमेंट करणं आवश्यक असेल. यामुळे कर्मचाऱ्यांना महिनोनंमहिने पैसे अडकवून राहणार नाहीत. Salary Payment Rules India
नवीन कायद्यानुसार कर्मचाऱ्यांना थकीत पगारासाठी ३ वर्षांपर्यंत दावा करण्याची संधी मिळेल. याआधी हा कालावधी वेगवेगळ्या कायद्यांनुसार ६ महिने ते २ वर्षांपर्यंत मर्यादित होता.
कंपनीने पगार जमा करण्याआधी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष किंवा इलेक्ट्रॉनिक सॅलरी स्लिप देणे गरजेचे आहे. त्यामुळे पगाराची माहिती जास्त पारदर्शक आणि स्पष्ट होईल.
पगार उशिरा मिळाल्यावर किंवा विनापरवानगी कपात झाल्यावर कर्मचारी निरीक्षक-सह-सुविधा अधिकाऱ्याकडे तक्रार करू शकतात. प्रकरण न सुटल्यास औद्योगिक न्यायालयात दावा दाखल करता येईल आणि गरज पडल्यास प्रशासनाकडून थकीत रक्कम वसूल केली जाऊ शकते.
टीप: वरील माहिती उपलब्ध माहितीच्या आधारे तयार करण्यात आली आहे. संबंधित नियमांची अंमलबजावणी आणि लागू होण्याबाबत अधिकृत सरकारी अधिसूचना किंवा संबंधित प्राधिकरणाकडून माहिती तपासून घ्यावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.