
ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर ही मराठी इंडस्ट्रीतील एव्हरग्रीन जोडी आहे. दोघेही नेहमी सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट करत असतात.
ऐश्वर्या आणि अविनाश यांची लव्हस्टोरीही खूपच हटके आहे.ऐश्वर्या यांचं लग्नापूर्वीच नाव पल्लवी आठल्ये होतं.
ऐश्वर्या या डोबिंवलीत राहायच्या. त्या शिकत असतानाच त्यांनी नाटकांमध्ये काम केले. त्यांना गंध निशिगंधाचा या नाटकात काम करायची संधी मिळाली. या नाटकात त्यांची आणि अविनाश नारकर यांची भेट झाली.
ऐश्वर्या अविनाश यांच्यापासून लांबच राहायच्या. परंतु अविनाश यांना पहिल्याच भेटीत ऐश्वर्या आवडल्या होत्या.
यानंतर त्यांच्या नाटकाचे दौरे असायचे. तेव्हा अविनाश मुद्दाम ऐश्वर्या यांच्या मागच्या सीटवर बसायचे.
अविनाश खिडकीच्या बाजूला बसायचे आणि खिडकी लावून घ्यायचे जेणेकरुन ऐश्वर्या यांचे प्रतिबिंब त्यांना पाहायला मिळेल.
यानंतर नाटक संपल्यावर त्यांनी ऐश्वर्या यांना प्रपोज केलं. ऐश्वर्या यांनीही लगेच होकार दिला.
यानंतर अविनाश यांनी ऐश्वर्या यांच्या घरी जाऊन लग्नाची मागणी घातली. नोकरी करतो त्याचोबत नाटक आणि मालिका करतो म्हणून कुटुंबियांनीही लगेचच होकार दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.