Salman Khan: हे काय बोलला सुलतान? सलमान खानचे बलुचिस्तानबद्दल स्टेटमेंट व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Salman Khan: सौदी अरेबियातील रियाध येथील जॉय फोरममध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खानने बलुचिस्तानला पाकिस्तानपासून वेगळे करण्याची घोषणा केली.हे विधान सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
Salman Khan
Salman KhanSaam tv
Published On

Salman Khan: बॉलिवूडमधील तीन मोठे खान - सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान - यांना एकाच मंचावर पाहणे हे चाहत्यांसाठी एका पर्वणीपेक्षा कमी नाही. नुकतेच सौदी अरेबियातील रियाध येथे झालेल्या जॉय फोरम २०२५ कार्यक्रमात हे तीन खान एकत्र दिसल्याने चाहत्यांना ही पर्वणी मिळाली. या कार्यक्रमात तिन्ही कलाकारांनी उद्योग आणि त्यांच्या कामाबद्दल बोलले. पण, सलमान खानने एक असे विधान केले ज्यामुळे आता वाद निर्माण झाला आहे. त्याच्या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बलुचिस्तानवर सलमानचे विधान

या कार्यक्रमादरम्यान सलमान भारतीय चित्रपटांच्या जागतिक विस्ताराबद्दल बोलत होता. तो म्हणाला की आज जर सौदी अरेबियामध्ये हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला तर तो सुपरहिट होतो. शिवाय, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपट देखील तिथे चांगला व्यवसाय करत आहेत, कारण अनेक भारतीय लोक तिथे राहतात आणि काम करतात. सलमान पुढे म्हणाला, "आपल्या देशातील अनेक लोक येथे आले आहेत. बलुचिस्तानातील लोक, अफगाणिस्तानातील लोक, पाकिस्तानातील लोक, सर्वजण येथे काम करतात."

Salman Khan
Box office collection: 'कंतारा चॅप्टर १' ने रविवारी केली बंपर कमाई; 'सनी संस्कार...'निघाला फुसका बार

व्हायरल विधान

सलमानचे विधान आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक युजर्स म्हणतात की सलमान खानने त्यांच्या विधानात बलुचिस्तानला पाकिस्तानपासून वेगळे वर्णन केले आहे, तर काहींना वाटते की हे विधान चुकले असावे. एका युजरने लिहिले की, "सलमान खानने अखेर कबूल केले आहे की बलुचिस्तान पाकिस्तानचा भाग नाही." दुसऱ्या युजरने लिहिले की, "आता सलमानला बलुचिस्तानचा पाठिंबा मिळणार आहे." दुसऱ्या युजरने लिहिले की, "भाईजानकडूम स्लिप ऑफ टंग झाली." दुसऱ्या युजरने लिहिले की, "बजरंगी भाईजान २: मिशन बलुचिस्तानची तयारी सुरू आहे." सध्या, या विषयावर सलमानकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Salman Khan
Priyanka Chopra: प्रियंका झाली मावशी; क्यूट स्टाईलमध्ये परी आणि राघव यांना दिल्या शुभेच्छा

बलुचिस्तान वाद

बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वात मोठा भाग आहे. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर पाकिस्तानने बलुचिस्तानला आपल्या हद्दीत समाविष्ट केले, परंतु तेथील अनेक संघटनांनी सातत्याने स्वातंत्र्य आणि स्वायत्ततेची मागणी केली आहे. असे म्हटले जाते की स्थानिक लोकांना या भागातील नैसर्गिक संसाधनांचा फायदा घेता येत नाही, यामुळे समस्या वाढत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com