
पुण्यातील अभिरुची थिएटरमध्ये ‘मनाचे श्लोक’ चित्रपटाचा शो बंद पाडला.
हिंदू संघटनेच्या उज्वला गौड यांनी चित्रपटाविरोधात आंदोलन केलं.
संत रामदास स्वामी यांच्या श्लोक आणि काही प्रसंगांवर आक्षेप घेण्यात आलाय
मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मनाचे श्लोक’ या मराठी चित्रपटाचा शो बंद पाडण्यात आलाय. पुण्यातील अभिरुची थिएटरमध्ये या चित्रपटाचा शो चालू होता. उज्वला गौड नावाच्या महिलेने हा शो बंद पाडला. उज्वला गौड हिंदू संघटनेशी संबंधित आहेत. चित्रपटात संत रामदास स्वामी यांच्या श्लोकाचे नाव असल्यामुळे आणि चित्रपटातील काही प्रसंग वादग्रस्त आहेत, असा आरोप करत उज्वला गौड यांनी शो बंद पाडला.
मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मनाचे श्लोक’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. प्रदर्शनापुर्वीच या चित्रपटाला विरोध करण्यात येत होता. पुण्यातील अभिरुची थिएटरमध्ये या चित्रपटाचा शो चालू होता, मात्र हिंदू संघटनेशी संबंधित असलेल्या एका महिलेने कार्यकर्त्यांनी घेऊन चित्रपटगृहात प्रवेश करत शो बंद पाडला.
समर्थ रामदास स्वामी महाराजांनी रचलेल्या ‘मनाचे श्लोक’ या पवित्र ग्रंथाच्या नावाचा वापर चित्रपटासाठी केल्यामुळे नव्या मराठी चित्रपटावर वादंग निर्माण झाला आहे. हिंदू जनजागृती समितीने या चित्रपटाला तीव्र विरोध दर्शवला होता. हा हिंदूंच्या श्रद्धेचा “बाजार मांडण्यासारखा प्रकार” असल्याचा आरोप संघटनेने केला होता.
समर्थ रामदास स्वामी महाराजांनी लिहिलेले मनाचे श्लोक हे पवित्र धार्मिक साहित्य आहे. या नावाचा वापर चित्रपटासाठी करणे हे केवळ श्रद्धेचा अपमानच नाही, तर धार्मिक भावनांना ठेस पोहोचवणारे आहे.” “मनाचे श्लोक हे शीर्षक चित्रपटातून त्वरित मागे घ्यावे आणि केंद्र तसेच राज्य शासनाने भविष्यात अशा धार्मिक प्रतीकांच्या अविचारी वापरावर बंदी घालण्यासाठी कायदा करावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते पराग गोखले यांनी केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.