Crime: ५० रूपयांच्या उधारीसाठी चाकूने सपासप वार, ३८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Latur Crime News: लातूरमध्ये ५० रुपयांच्या उधारीसाठी तरुणाची हत्या करण्यात आल्याची भयंकर घटना घडली. या प्रकरणी दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
Latur Crime
Latur CrimeSaam tv
Published On

संदीप भोसले, लातूर

लातूरमध्ये ५० रुपयांसाठी एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. लातूर शहरातल्या म्हाडा कॉलनी येथे ही घटना घडली. पान टपरी चालकाने उधारीचे पैसे मागितले त्यावरून भयंकर वाद झाला. या वादातून पान टपरी चालकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. तर या चाकू हल्ल्यात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी दोघांविरोधात लातूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ५० रुपयांची उधारी मागितली म्हणून लातूरमध्ये एकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. लातूर शहरातल्या म्हाडा कॉलनी येथे पान टपरी चालकाने उधारी मागितली यावरून सुरुवातीला किरकोळ वाद झाला आणि या वादातून टपरी चालक गणेश सूर्यवंशी (वय ३८ वर्षे) याची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. तर इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी आरोपी शहजाद शेख, आणि अब्बास शेख यांच्याविरोधात लातूरच्या विवेकानंद पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latur Crime
Solapur Crime: रॉड, बॅट अन् दगड... सोलापुरात भरचौकात तुफान राडा, १५ ते २० जणांनी एकमेकांना तुडवलं

पानटपरी चालकाच्या हत्येची ही घटना सोमवारी रात्री १०:१५ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून राजू दासराव साळुंके (वय ३५ रा. म्हाडा कॉलनी, बाभळगाव रोड, लातूर) यांनी फिर्यादीत म्हटले आहे. लातूरमधील म्हाडा कॉलनीत रस्त्यालगत गणेश सूर्यवंशीची पानटपरी आहे. याच परिसरामध्ये राहणाऱ्या एकाकडे पानटपरीची ५० रुपयांची उधारी होती. उधारीवरुन शेख अब्बास आणि शेख शहजाद (दोघेही रा. म्हाडा कॉलनी) यांनी देवीदास गायकवाड यांचा मुलगा बालाजी याच्या टपरीवर वाद घातला होता आणि धमकी दिली.

Latur Crime
Kolhapur Crime : साथीदारांसोबत नोकराने आखला चोरीचा प्लॅन; पावणेदोन कोटी रुपये चोरणारी टोळी ताब्यात

पोलिसांनी पुढे सांगितले की, 'याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या नातेवाईकावर दोघांनी धारदार शस्त्राने, सुरा, कोयत्याने हल्ला केला. यात गणेश सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला तर इतर तिघे जखमी झाले. जखमींची प्रकृती गंभीर आहे. उधारीवरून आरोपी आणि पान टपरी चालकात वाद झाला. नातेवाईकांसोबत गेलेल्या गणेश सूर्यवंशीला मात्र आपला जीव गमवावा लागला आहे.' दरम्यान, जानेवारी ते मे २०२५ या ५ महिन्यात क्षुल्लक कारणावरुन लातूर जिल्ह्यात १५ खुनाच्या घटना घडल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Latur Crime
Pune Crime : पुण्यात इंदौरी इश्क! प्रसिद्ध तरुणी रिलस्टारने बॉयफ्रेंडचे हात-पाय बांधले, नंतर केलं धक्कादायक कृत्य; शहरात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com