
नोकरीधारकांसाठी पीएफ योजना निवृत्तीनंतरच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच इतर आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी मदत करते. या योजनेमुळे निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना अधिकचा फायदा होतो. त्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात त्याची बचत करणे खूप महत्त्वाचे आहे. आर्थिक आव्हानाची चिंता न करता ६० वर्षांनंतर तुमचे जीवन सुरक्षित करण्यासाठी हे तुम्हाला एक मोठा निधी उभारण्यास मदत करते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) ही एक निवृत्ती योजना आहे जी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना द्वारे व्यवस्थापित केली आहे.
ही योजना पगारदार कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आली आहे. जेणेकरून त्यांना नियोक्ता आणि कर्मचारी दोघांकडून नियमित योगदानाद्वारे निवृत्ती निधी उभारण्यास मदत होईल. कर्मचारी आणि नियोक्ता दोघेही कर्मचाऱ्याच्या मूळ पगाराच्या १२% आणि महागाई भत्ता (DA) ईपीएफ खात्यात जमा करतात. कर्मचाऱ्याच्या १२% योगदानापैकी ८.३३% ईपीएसमध्ये आणि ३.६७% ईपीएफमध्ये जाते.
कर्मचाऱ्याचा मूळ पगार आणि महागाई भत्ता २५ हजार महिना असेल तर कर्मचाऱ्यांचे योगदान पगाराच्या १२% असेल. कर्मचाऱ्याचे योगदान पगाराच्या १२% म्हणजेच पेन्शनमध्ये त्याची रक्कम ८.३३% राहते आणि उर्वरित रक्कम ईपीएफमध्ये टाकली जाते. या कालावधीत पैसे काढले जाणार नाहीत अशी परिस्थिती गृहीत धरली जाते.
म्हणजेच कंपनीने दिलेल्या २५,००० रुपये प्रति महिना पगारावर, १२% दराने कर्मचाऱ्याचे योगदान ३,००० रुपये/महिना असेल आणि कर्मचाऱ्याचे ३.६७% दराने योगदान ९१७.५ रुपये/महिना असेल, ज्यामुळे दरमहा एकूण योगदान ३,९१७.५ रुपये होईल. म्हणजेच, वार्षिक योगदान दरवर्षी ४७,०१० रुपये होईल.वरील अंदाजानुसार ईपीएफ मॅच्युरिटी १० वर्षांत अंदाजे ७.४५ लाख रुपये, १५ वर्षांत अंदाजे १४.०८ लाख रुपये आणि २० वर्षांत २३.०९ लाख रुपये मिळतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.