

LPG ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून LPG ग्राहकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. गॅस कनेक्शनची ई केवायसी करण्याची मुदत आता संपली आहे. याची शेवटची तारीख १४ सप्टेंबर २०२६ होती, मात्र आता ग्राहकांच्या मनात असा गोंधळ आहे की, एकदा ईकेवायसी केली की पुन्हा Re-KYC करण्याची गरज आहे का?
सामान्य एलपीजी ग्राहकांनी आधार बायोमेट्रिक किंवा फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून ईकेवायसी एकदा पूर्ण केली असेल, तर प्रत्येक वेळी ती परत करण्याची गरज बऱ्याचदा नसते. मात्र, ग्राहकाच्या नोंदीत काही महत्त्वाचा बदल झाल्यास KYC तपशील अपडेट करण्याची आवश्यकता निर्माण होऊ शकते.
उदाहरणार्थ, रजिस्टर्ड मोबाईल नंबर, पत्ता किंवा कनेक्शनशी संबंधित इतर माहितीमध्ये बदल झाल्यास ग्राहकांनी आपल्या गॅस वितरकाकडे नोंद अपडेट करून घेतली पाहिजे. अधिकृत KYC माहितीनुसार पत्ता किंवा मोबाईल क्रमांक बदलल्यास वितरकाला त्याची माहिती देणे अपेक्षित आहे.
PMUY अर्थात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांबाबत मात्र विशेष नियम लागू होऊ शकतात. त्यामुळे सब्सिडी किंवा योजनेशी संबंधित लाभासाठी Re-KYCची आवश्यकता आहे का, हे आपल्या संबंधित LPG कंपनीकडून तपासणे महत्त्वाचे आहे.
ज्या ग्राहकांनी अजूनपर्यंत E-KYC केलेलीच नाही, त्यांनी ती शक्य तितक्या लवकर पूर्ण करून घेणे योग्य ठरेल. PMUYच्या अधिकृत पोर्टलवर KYCसंदर्भातील माहिती आणि सेवा उपलब्ध आहेत.
त्यामुळे “एकदा E-KYC झाली म्हणजे आयुष्यभर Re-KYCची गरज नाही” असे सरसकट समजू नका. तुमच्या कनेक्शनची माहिती, योजना आणि कंपनीच्या लागू नियमांनुसार पुढील KYC आवश्यक आहे का, हे तपासणे महत्त्वाचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.