
प्रत्येकजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुखकर व्हावे, यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला भविष्यात पेन्शन मिळते. एलआयसीची अशीच एक योजना म्हणजे एलआयसी जीवन शांती योजना. या योजनेत तुम्हाला दर महिन्याला पेन्शन मिळते.(LIC Jeevan Shanti Yojana)
सेवानिवृत्तीनंतर उत्पन्नाचे कोणतेही साधन नसते. त्यामुळे तुम्हाला दर महिन्याला पेन्शन दिली जाते. तुम्ही काही योजनांमध्ये गुंतवणूक करुन दर महिन्याला पेन्शन मिळू शकतात. एलआयसीच्या न्यू जीवन शांती योजनेत तुम्हाला चांगला परतावा मिळतो. या योजनेत तुम्हाला फक्त एकदाच गुंतवणूक करायची असते. त्यानंतर आयुष्यभर पेन्शन मिळते.
एलआयसी जीवन शांती योजना
एलआयसीची जीवन शांती योजना खूप फायदेशीर आहे. या योजनेत तुम्हाला एकदा गुंतवणूक करायची आहे. त्यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळणार आहे. या योजनेत तुम्ही दर वर्षी १,००,००० रुपये पेन्शन मिळवू शकतात. एलआयसीच्या न्यू जीवन शांती योजनेत ३० ते ७९ वयोगटातील नागरिक अर्ज करु शकतात. या योजनेत तुम्हाला डेफर्ड अॅन्युटी फॉर सिंगल लाइफ आणि डेफर्ड अॅन्युटी फॉर जॉइंट लाइफ असे दोन ऑप्शन असतात. यामध्ये तुम्ही गुंतवणूक करु शकतात.
एलआयसी न्यू जीवन शांती योजनेत तुम्ही १ लाख रुपयांची वार्षिक पेन्शन मिळवू शकतात. या योजनेत तुम्हाला चांगले व्याजदर मिळते. जर तुम्ही या योजनेत ११ लाख रुपये गुंतवतात आणि हे पैसे ५ वर्षांसाठी गुंतवले असतील तर तुम्हाला वयाच्या ६० वर्षानंतर दर वर्षी १,०२,८५० रुपयांची पेन्शन मिळणार आहे.
या योजनेत तुम्हाला ६ महिन्याच्या आधारे व्याज मिळते. त्यामुळे तुम्हाला ५०,३६५ रुपये मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला ८,२१७ रुपये पेन्शन दर महिन्याला मिळेल. एलआयसी न्यू जीवन शांती योजनेत जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर गुंतवलेली रक्कम नॉमिनीच्या अकाउंटला जमा केली जाते. या योजनेत तुम्ही १.५ लाखांपासून गुंतवणूक करु शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.