मोदी सरकार आता विद्यार्थ्यांना 1 कोटी रुपयांचं बक्षीस देणार आहे...होय, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...पण, खरंच मोदी सरकार देशातील विद्यार्थ्यांना एवढं मोठं बक्षीस देणार आहे का...? एवढं बक्षीस देण्यामागचं कारण काय...? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत...
विकसित भारत 2047 चे उद्दिष्ट समोर ठेवून विद्यार्थ्यांच्या कल्पनांना पंख देण्याचा उपक्रम आहे.विजेत्या विद्यार्थ्यांना 1 कोटींचं बक्षीस मिळणार आहे.
हा मेसेज व्हायरल होत असल्याने अनेकांना उत्सुकता लागलीय...हे बक्षीस मिळवण्यासाठी काय करावं लागेल...? याचा कुठे अर्ज आहे का...? असे प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेयत...त्यामुळे याची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने पडताळणी सुरू केली..
मोदी सरकारचा हा विद्यार्थ्यांसाठी उपक्रम
विद्यार्थ्यांना डोक्यातील आयडिया सांगाव्या लागतील
सहावी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्राचा उपक्रम
6 ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थी नोंदणी करू शकतील
13 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरपर्यंत प्रवेशिका जमा करू शकतात
जानेवारी 2026 मध्ये विजेत्यांची नावं घोषित करणार
शाळेतूनही ही माहिती मिळू शकते...व्होकल फॉर लोकल, आत्मनिर्भर भारत, स्वदेशी आणि समृद्ध भारत या चार थीम देण्यात येतील...विद्यार्थ्यांच्या डोक्यातील नवीन आयडियाजचा विचार केला जाईल...विजेत्यांमध्ये 10 राष्ट्रस्तरीय, 100 राज्यस्तरीय आणि 1 हजार जिल्हास्तरीय विजेत्यांना सन्मानित केलं जाणार आहे...एकूण एक कोटी रुपयांची बक्षिसं जिंकण्याची संधी आहे...त्यामुळे आमच्या पडताळणीत मोदी सरकार विद्यार्थ्यांना 1 कोटी देणार असल्याचा दावा सत्य ठरलाय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.