Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

Sakshi Sunil Jadhav

मुरुंबदेव ते राजगड

राजगडाचे जुने नाव मुरुंबदेव होते. छत्रपती शिवाजी महाराज्यांनी १६४७ मध्ये किल्ला जिंकून त्याचा मजबूत गड म्हणून विकास केला.

Rajgad Fort History

२६ वर्षांहून जास्त काळ राजधानी

राजगड हा १६४७ ते १६७४ पर्यंत मराठा साम्राज्याची राजधानी होता. याच काळात गडावरून प्रशासन आणि लष्करी नियोजन केले जात होते.

Murumbdev Fort

मुघलांना जिंकता आला नाही

मुघल आणि आदिलशाही सैन्याने राजगडावर अनेकदा हल्ले केले. मात्र मजबूत तटबंदी आणि भौगोलिक रचनेमुळे किल्ला जिंकणे त्यांना कठीण गेले.

Shivaji Maharaj

तीन प्रमुख बालेकिल्ला

राजगडावर पद्यावती, संजीवनी आणि सुवेळा या तीन प्रमुख माच्या आहेत. मध्यभागी असलेला बालेकिल्ला गडाच्या संरक्षणातील महत्त्वाचा भाग होता.

Rajgad Maharashtra

सुरतेच्या मोहिमेतील ठेवा

१६६४ च्या सुरत मोहिमेनंतर मिळालेली संपत्ती राजगडावर सुरक्षित ठेवण्यात आल्याचे संदर्भ आढळतात. त्यामुळे गडाचे आर्थिक आणि प्रशासकीय महत्त्वही स्पष्ट होते.

Rajgad fort architecture

पुरंदरचा तह

१६६५ च्या पुरंदरच्या तहानंतर शिवाजी महाराजांकडे ठेवण्यात आलेल्या १२ किल्ल्यांमध्ये राजगडाचा समावेश होता. यावरून त्याचे सामरिक महत्त्व दिसून येते.

Rajgad trekking

राजाराम महाराजांचा जन्म

छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराजांचा जन्म राजगडावर झाला. शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई यांचे निधनही याच किल्ल्यावर झाले.

Rajgad historical importance

लष्करी नियोजनाचे प्रमुख केंद्र

शिवाजी महाराजांनी राजगडावरून अनेक लष्करी मोहिमांचे नियोजन केले. सह्याद्रीतील स्थानामुळे गडाला संरक्षण आणि रणनीतीच्या दृष्टीने मोठे महत्त्व होते.

Raigad capital

१६७४ मध्ये राजधानी रायगडावर

१६७४ मध्ये राजधानी राजगडावरून रायगडावर हलवण्यात आली. त्यानंतरही राजगड मराठा इतिहासातील महत्त्वाचा आणि ऐतिहासिक वारसा असलेला किल्ला राहिला.

Raigad capital

NEXT : या ४ ठिकाणी दान केल्याने वाढते श्रीमंती, चाणक्यनितीतले महत्त्वाचे विचार नक्कीच वाचा

help needy students | pintrest
येथे क्लिक करा