सकाळ पासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा तडाखा नवी मुंबईला देखील बसला आहे. जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे रेल्वे विस्खळीत झाली आहे. कळंबोली येथे मुसळधार पावसामुळे पटरीवर पाणी साचलं आहे. यामुळे प्रवाशांचे खुप हाल होत आहेत. यादम्यान कोकणाकडे जाणाऱ्या गाड्यांचा खोळंबा झाला आहे. पटरीवर पाणी साचल्यामुळे कोकणातून येणाऱ्या गाड्या या अडकल्या आहेत. सद्या मेंगलोर एक्सप्रेस गाडी मुंबईला येण्यासाठी निघाली होती. काही प्रवाशी गाडीतून उतरून जावू लागल्याची माहिती समोर येत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.