विजय वडेट्टीवार यांनी ‘एकला चलो रे’चा नारा दिला.
स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी काँग्रेसने स्वबळावर उतरावे, असा सल्ला.
हा वैयक्तिक सल्ला असून इतर नेत्यांचे मत वेगळे असू शकते.
महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतून लढल्यानंतर आता स्वतंत्र लढण्याची भूमिका.
मुंबई: काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात मोठं विधान करत ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. मी नेत्यांना सांगणार आहे. आतापर्यंत आपण महाविकास आघाडीतून, इंडिया आघाडीतून लढलो. पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपण स्वतःच्या भरवश्यावर उतरायला हवं, असं वडेट्टीवार म्हणाले.
त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, हा त्यांचा वैयक्तिक सल्ला आहे, इतर नेत्यांचे वेगळे मत असू शकते. मात्र, पक्षाने स्थानिक पातळीवर स्वबळावर लढण्याचा निर्णय घ्यावा, अशी त्यांची ठाम भूमिका आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.