सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली असून दक्षिण तालुक्यातील वडजी गावात विशेषतः मोठ्या प्रमाणावर पावसाचा फटका बसलाय. काल सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले असून घरातील वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे.
गावकऱ्यांनी वडजी ग्रामपंचायतीवर थेट आरोप करत, ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे नाल्यांची सफाई झाली नाही आणि त्यामुळेच पावसाचे पाणी घरात शिरले, असे सांगितले. काही घरांमध्ये तर पाण्यामुळे भिंती कोसळण्याचा धोका निर्माण झाला असून ग्रामस्थ भीतीच्या वातावरणात आहेत.
स्थानिक प्रशासनाकडून अद्याप कोणतीही मदत पोहोचलेली नसल्याची तक्रारही गावकऱ्यांनी केली आहे. लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदतीची गरज असल्याचं ते सांगत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.