सर्वांच्या लाडक्या सुखकर्ता, विघ्नहर्ता बाप्पाच्या स्वागतासाठी ३ आठवड्यांपासून राज्यभरात लगबग सुरू होती. घराघरात चैतन्य घेऊन आलेल्या गणरायाची आराधना करताना १० दिवस कधी संपले, कळलेच नाही. या आनंदोत्सवाची आज सांगता होणार आहे. 'गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला…' अशा घोषणा देत शहरातील मानाचे गणपती, विविध मंडळे आणि नागरिक आज लाडक्या बाप्पाला निरोप देणार आहेत. विसर्जन मिरवणुकीत, बाप्पाला निरोप देण्यासाठी पावसाच्या सरीही हजेरी लावणार असल्याचे वेधशाळेने सांगितले आहे.
आज, शनिवारी, महाराष्ट्रात अनंत चतुर्दशीच्या शुभ मुहूर्तावर गणपती विसर्जनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. लाखो भाविक आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देत आहेत. गणेशोत्सवाचा समारोप करताना, मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूरसह राज्यभरात मिरवणुका निघाल्या असून, ढोल-ताशांच्या गजरात आणि "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" च्या जयघोषात बाप्पांचे विसर्जन होत आहे. मुंबई, पुण्यासह राज्यभरात पोलिसांचाही तगडा बंदोबस्त करण्यात आलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.