धाराशिव जिल्ह्यातील महापुरग्रस्तांना आधार देण्यासाठी तुळजाभवानी मंदिर संस्थान सरसावले आहे. संस्थानकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला तब्बल एक कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. तसेच परंडा तालुक्यातील पूरग्रस्त महिलांना 1000 साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. महापुरामुळे उध्वस्त झालेले संसार, खरडून गेलेली शेती आणि वाहून गेलेली जनावरे या संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठीही संस्थानकडून विशेष मदत करण्यात आली आहे.
ही सर्व मदत धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.