संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा यवतमधील मुक्काम आटोपून आता भांडगावमध्ये विसाव्यासाठी थांबला आहे. वारीच्या या महत्वाच्या टप्प्यावर भांडगाव हे स्थान वारकऱ्यांसाठी विश्रांतीचं आणि नव्या उर्जेचं केंद्र बनतं आहे. या ठिकाणी पालखीच्या सोबतीने चालणारे लाखो वारकरी अल्प विश्रांती घेतात. भक्तिरसात तल्लीन होऊन टाळ-मृदंगाच्या गजरात हरिनाम संकीर्तनात सहभागी होतात.याच ठिकाणी वारकऱ्यांची सामूहिक न्याहारीही होते.
या मुक्कामा नंतर पालखी सोहळा पुढील टप्प्याकडे, म्हणजेच वरवंडकडे मार्गस्थ होतो. वरवंड हा मुक्काम तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गातील एक महत्त्वाचा आणि सर्वात जवळचा टप्पा मानला जातो. वारकऱ्यांच्या शिस्तबद्ध दर्शन रांगा, अभंग गायन, फड, आणि वातावरणात भरलेली भक्तीची ऊर्जा यामुळे भांडगाव आणि वरवंड परिसर सध्या संपूर्ण भक्तिमयतेने न्हालेला आहे. प्रशासनाच्यावतीनेही सोहळ्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.