जम्मू काश्मीरच्या येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. यावर सर्वस्तरातून पाकिस्तानवर आणि दहशतवाद्यांना ठेचण्याची मागणी होत असताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी अजब तर्क लावत गजब सल्ला दिला आहे. संजय गायकवाड म्हणाले, राज्यात हिंदी काय उर्दू ही पाहिलीपासून शिकवा अशी मागणी केली आहे.
आज देशात कुठेही गेलं तरी हिंदी आणि इंग्लिशमध्ये बोलले जाते. संभाजी महाराजांना सोळा भाषा अवगत होत्या. आता तुम्ही त्यांच्या या विचाराला लाथ मारणार आहात का? तसेच शिवाजी महाराज हे बहुभाषिक होते. अरे आज आमचं पोरग जगात फिरलं तर त्याला प्रत्येक भाषा आली पाहिजे. असा सल्ला देत संजय गायकवाड पुढे म्हणाले, हिंदीच नाही तर उर्दू भाषा ही पहिली पासून शिकवली पाहिजे. हे आतंगवादी मेसेज पाठवताना ते आपल्याला समजत नाही म्हणून आपण उर्दू शिकले पाहिजे असं अनोख विधान केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.