लोकसभा निवडणुकीत भाजपला २४० जागांवर समाधान मानावं लागलं. अजित पवार यांना महायुतीत सामील करून घेणे हे महाग पडलं, भाजपचा आत्मविश्वास नडला अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपचे कान टोचले आहेत. संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर या मासिकात हा लेख छापून आला आहे. त्यात म्हटलंय की शिंदे गट असताना भाजपला अजित पवारांची काय गरज होती, त्यामुळे मोदी ब्रॅण्डची व्हॅल्यू कमी झाली. ज्यांच्याविरोधात संघाचे कार्यकर्ते लढले त्यांनाच सत्तेस सामील करून घेतलं, त्यामुळे कार्यकर्ते दुखावले गेले. राष्ट्रवादीच्या अंतर्गत भांडणातच शरद पवार यांची शक्ती कमी झाली असती असेही मुखपत्रात म्हटले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.