जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण भारतीयांचे मन सुन्न झाले असताना कॉँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी वादग्रस्त विधान केले आहे. आपल्या देशात हिंदू आणि मुस्लिम यांच्यात दरी निर्माण झाली आहे. देशातील मुस्लिमांना असुरक्षित वाटतं असल्याचं ते म्हणाले.
रॉबर्ट वाड्रा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली. या हल्ल्यामुळे मला खूप दु:ख झाले आहे. या हल्ल्यातील मृतांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. आपले सरकार हे हिंदुत्वाबद्दल बोलते. त्यामुळे अल्पसंख्याकांना असुरक्षित वाटते. हल्ल्याकडे नीट बघितले तर तुम्हाला कळेल की दहशतवादी हल्ला करताना लोकांची ओळख पटवत होते. ते असे का करत असतील? कारण आपल्या भारतात हिंदू आणि मुस्लिम फूट पाडण्यात आली आहे, असे वादग्रस्त विधान रॉबर्ट वाड्रा यांनी केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.