भाजपचे नविन प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी साम टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाईट या खास कार्यक्रमाला मुलाखत दिली. राजकीय रणनीती, आगामी निवडणुकीतील भाजपची तयारी, आणि महाराष्ट्रातील बदलत्या राजकारणावर थेट भाष्य केले. भाजपचे प्रदेशाध्यक्षपद कसे मिळाले याबाबत विचारले असता ते म्हणाले, मी ज्यावेळेला काम करायला सुरुवात केली. त्या काळामध्ये मग ते नगरसेवक असेल किंवा त्यानंतरच्या काळात आमदार झालो.
हा प्रवास जो आहे तो प्रवास ज्यांनी ज्यांनी बघितला. जे त्यावेळेचे नेते होते, त्यावेळी नितीन गडकरी हे प्रदेशाध्यक्ष होते. कल्याण विधानसभा जी होती त्याचे चार मतदारसंघ झाले होते. त्यामध्ये नव्याने झालेला डोंबिवली मतदारसंघ होता. आणि युतीमध्ये एकच मतदारसंघ हा भाजपला मिळणार असे जेव्हा लक्षात आले होते.
त्यावेळेला ही जबाबदारी फार मोठी होती. तेव्हा मला नितीन गडकरी म्हणाले होते. पुढील काळात पक्ष वाढीसाठी काही लोकांपैकी तू एक आहे आणि कोणाला तरी डावलून मला उमेदवारी मिळाली होती. पक्षाने माझ्यासाठी इतके केल्यानंतर तेव्हा मी ठरवले होते की येणाऱ्या काळात पक्षवाधीसाठी नक्की काम करेल असे भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.