Ramdas Kadam & Bharat Gogawale Saam TV
Video

Ramdas Kadam : "पालकमंत्री व्हायचं असेल तर मुंबई-गोवा महामार्ग नीट करा" रामदास कदम यांच भरत गोगावले यांना आवाहन | VIDEO

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरुस्तीच्या प्रश्नावरून शिवसेनेचे नेते रामदास कदम आक्रमक झाले आहेत. "१५ वर्ष झाली तरी आपला वनवास संपत नाही," असा टोला त्यांनी लगावला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून शिवसेना नेते रामदास कदम यांनी संताप व्यक्त करत पालकमंत्री भरत गोगावले यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. "१५ वर्ष झाली तरी आपला वनवास संपत नाही," अशा शब्दांत त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

कदम म्हणाले, "कोकण शिवसेनेचं असल्यामुळे हायवेला निधी मिळत नाही का?" असा थेट सवाल करत त्यांनी शासनाच्या दुर्लक्षावर ताशेरे ओढले आहेत. त्यांनी भरत गोगावले यांना उद्देशून म्हटलं, "जर पालकमंत्री म्हणून खरोखरच जबाबदारी पार पाडायची असेल, तर सर्वप्रथम मुंबई-गोवा महामार्ग नीट करा."रामदास कदम यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा महामार्गाच्या कामांचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blue Jeans Ban: 'या' देशात निळी जीन्स घातल्यास होतो तुरुंगवास?

आधी वहिनीचं डोकं दगडानं ठेचलं; नंतर भावाचा जेथे मृतदेह सापडला होता तेथेच घेतला गळफास, दुहेरी हत्याकांडाचं गूढ काय?

अजित पवार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; ब्लॅक बॉक्सचा डेटा पूर्ण डाउनलोड, पुण्यतिथीआधी सत्य बाहेर येणार, मुख्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

Monsoon Tips: पावसाळ्यात घरातील कुबट वास होईल गायब, फक्त पाण्यात उकळा 'या' ५ वस्तू करते

Monsoon Rain : पावसात भिजल्यावर लगेच गरम पाण्याने आंघोळ करावी का?

SCROLL FOR NEXT