रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने आणि चिखल साचल्यामुळे अनेक वाहने अडकली असून, वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.घाटमाथ्यांवर आणि अरुंद रस्त्यांवरून वाहने संथ गतीने पुढे सरकत असून, काही ठिकाणी वाहने तासन्तास रांगेत अडकून पडली आहेत.
पावसामुळे रस्त्यांची अवस्था खडतर झाली आहे, त्यामुळे वाहनचालकांच्या त्रासात अधिकच वाढ झाली आहे. स्थानिक प्रशासन आणि वाहतूक विभागाकडून रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र सततच्या पावसामुळे मदत कार्यात अडथळे निर्माण होत आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना अत्यावश्यक नसल्यास प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.