मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी एकत्र येण्याची तयारी दर्शवली आणि उद्धव ठाकरे यांनी देखील त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. आज दिवसभर हा विषय सर्वच राजकीय प्रतिनिधीसाठी चर्चेचा विषय बनला असून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. यावर सर्वाच पक्षाच्या नेत्यांनी आपापले मत दिले. मात्र, शिवसैनिकांच्या मनात याबद्दल तीव्र आनंद झाल्याचे पाहायला मिळत आहे.
शिवसैनिक आणि मनसैनिक यांची विचारधारा सारखीच असून खळखट्याक आणि तोडफोडीची आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे वेगळे झाल्यानंतर कार्यकर्ते हे दुभागले गेले असल्याची भावना शिवसैनिकांनी बोलून दाखवली. तसेच ठाकरे बंधू एकत्र आले तर काही राजकीय पक्षांच्या पोटात दुखत आहे असे देखील शिवसैनिक म्हणाले. तर मनसे आणि शिवसेना युती झाली तर बाकीचे पक्ष हे बंद होतील आणि ठाकरे बंधूंमुळे महाराष्ट्रात बदल होऊ शकतो. मराठी माणसाला न्याय मिळू शकतो आणि मराठी माणसाला कामाला लाऊ शकता असा विश्वास शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.