वर्षभराच्या आत नरेंद्र मोदी प्रधानमंत्री नसतील असा मोठा दावा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. राष्ट्रीय आदिवासी प्रोफेशनल कॉन्क्लेवमध्ये बोलताना त्यांनी देशात भीषण आर्थिक त्सुनामी येणार असल्याचा इशारा दिला. निवडणूक आयोग आणि न्यायव्यवस्थेसह संपूर्ण व्यवस्था आतून ढासळत असून अधिकारी बंड करतायत. अशी माहिती आपल्याला मिळाल्याचं सांगत राहुल गांधींनी देशात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केलीय.
वर्षभराच्या आत मोदी सरकार कोसळेल, असा दावा करत राहुल गांधी यांनी राजकारणात खळबळ उडावून दिली. देशात सरकार आणीबाणी लावेल, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या या दाव्यावर अद्याप मोदींकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. भाजप नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे काय उत्तर देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.