केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल उद्या नाशिक दौऱ्यावर आहेत. तत्पूर्वी नाशिकचे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले दिसत आहेत. पियूष गोयल यांनी नाशिकमध्ये येण्याआधी कांद्याच्या निर्यातीवरील २० टक्के शुल्क हटवावं अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत. तरच आम्ही त्यांचं स्वागत करू असंही शेतकऱ्यांचं म्हणण आहे.
नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्राच्या स्वामित्व कार्ड योजनेच्या कार्यक्रमासाठी उद्या पियूष गोयल नाशिकमध्ये येणार आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यात कांद्याचे भाव घसरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपयांचा तोटा होत आहे. कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क हटवण्यात यावा अशी मागणी शेतकरी करत आहेत. हे निर्यात शुल्क हटवूनच गोयल यांनी नाशिकमध्ये यावं तरच आम्ही त्यांचं स्वागत करू असा आक्रमक पवित्रा आता येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घेतला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.