नांदेडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला आहे. ईसापुर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पैनगंगा नदीला पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतपीकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. या नदीवर अलेल्या नांदेड जिल्ह्यातील सहस्रकुंड धबधब्याने देखील रौद्ररूप धारण केले आहे.
यवतमाळ आणि नांदेड या दोन जिल्ह्याच्या मध्यभागातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला पूर आला आहे. या पूरामध्ये यवतमाळ आणि नांदेड या दोन जिल्ह्याला जोडणाऱ्या विदर्भातील शेवटच्या टोकावर असलेल्या यवतमाळच्या कवठाबाजार येथील पैनगंगा नदीवरचा पुल पुरामुळे वाहून गेल्याने यवतमाळ आणि नांदेडचा संपर्क तुटला आहे. नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागाचे पितळ या निमित्ताने उघड पडलं पडल्याची चर्चा सुरू आहे.
यवतमाळच्या कवठाबाजार आणि नांदेडच्या माहूर तालुक्यातील वडसाफडसा या गावांना पैनगंगा नदीवरचा पुल पुराच्या पाण्यामुळे वाहून गेल्याने सध्या तरी दोन्ही जिल्ह्याचा संपर्क तुटलाय. तर पैनगंगा नदीला पूर आल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या कवठा बाजार येथील शेकडो एकर शेत पिक पैनगंगा नदीच्या पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालंय. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.