डोंबिवली: जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भीषण हल्ला करत रक्ताचा सडा सांडला. यामध्ये महाराष्ट्रातील 6 नागरिकांचा मृत्यू झाला असून डोंबिवली येथील तीन मावस भावांची ही सहल अखेरची ठरली. या सगळ्याचा निषेध करत डोंबिवलीकरांनी सरकारच्या प्रति संताप व्यक्त केला आहे. सरकारने उत्तर द्यावे पर्यटकांनी स्वतःचे बलिदान देण्यासाठी काश्मीरला जायचे का? तुम्हाला जर आधीच धमकी आली होती तर तुम्ही तिथली सुरक्षारक्षा वाढवली का नाही? कुठे आहे देशाचे पंतप्रधान? असा प्रश्नांचा भडिमार डोंबिवलीच्या नागरिकांनी सरकारवर केला. मंत्र्यांना जी झेड प्लस सुरक्षा आहे ती काढा आणि सर्व सामान्यांना द्या अशी मागणी स्थानिकांनी केली. मला खुर्ची पाहिजे, आम्हाला सत्ता पाहिजे मतांसाठी आमच्याकडे भीक मागायला येतात असा आक्रोश नागरिकांनी व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.