17 वर्षांपूर्वी म्हणजेच 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावच्या भिक्कू चौकात बॉम्बस्पोट झाला होता. यानंतर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना अटक करण्यात आली होती. आज या प्रकरणातील 7 आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. यावर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. आता यावर मंत्री नितेश राणे यांनीही सविस्तर भाष्य करत कॉंग्रेसवर टीका केली आहे.
नितेश राणे म्हणाले, समाजाची बदनामी जी या मालेगावच्या प्रकरणातून करण्याचा प्रयत्न होता, त्यांना तोंडावर चपराक मिळाली आहे. त्यामुळे यापुढे हिंदू समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. परत परत एकच विषय सिद्ध होतो की, आतंकवादाचा रंग आणि जिहादाचा रंग हा हिरवाच आहे. कॉँग्रेसच्या काळात हिंदुत्ववादी लोकांवर खोट्या केस करण्यात आल्या आणि त्यांना अडकवण्यात आले असे नितेश राणे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.