नाशिक : नाशिकमध्ये (Nashik News Today) समता परिषदेनं आंदोलन केलं. नाशिक शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर समता परिषदेकडून आंदोलन करण्यात आलं. शालेय अभ्यासक्रमातून मनुस्मृतीचे श्लोक रद्द झालेच पाहिजे, अशी मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली. मनुस्मृति हटाव, देश बचाव, अशा घोषणा समता परिषदेच्या कार्यकर्त्यांची आंदोलन करताना दिल्या. मनुस्मृतीच्या ग्रंथाचं देखील समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी दहन करण्यात आलं. जितेंद्र आव्हाड आणि छगन भुजबळ यांनी मनुस्मृतीच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर आता राज्यभर हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांनीही मनुस्मृतीला विरोध करावा, असं भुजबळांनी म्हटलं होतं. त्यानंतर नाशकात मनुस्मृतीविरोधात तीव्र रोष पाहायला मिळालाय. समता परिषदेनं रस्त्यावर उतरुन मनुस्मृतीविरोधात जोरदार निदर्शनं केली आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.