नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तापी नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सारंखेडा आणि प्रकाश धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून त्यामुळे नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.प्रकाश आणि सारंखेडा मध्यम प्रकल्प क्षेत्रातील तापी नदीकाठच्या सुमारे १५ गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारीचे उपाययोजना सुरू आहेत . नागरिकांनी नदीकाठच्या भागात अनावश्यक वावर टाळण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.