Mumbai Water Storage Saam Tv
Video

Mumbai Water Storage: दिलासादायक! मुंबईला पाणी पुरवठा करणारी चार धरणं ओव्हरफ्लो, पाहा VIDEO

Rohini Gudaghe

मुंबई : मुंबईच्या पाणीसाठ्यासंदर्भात मोठी अपडेट समोर आलीय. मुंबईला पाणी पुरवठा करणारी चारही धरणं ओव्हर फ्लो झाल्याची माहिती मिळत आहे. तानसा, मोडकसागर, भातसा आणि वैतरणा या चारही धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मुंबईकरांची पाण्याची तहान भागवणारी धरणं आता काठोकाठ भरलेली आहेत. जुलै महिन्यात चांगला पाऊस झालाय. यामुळे धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाणीसंकटापासून दिलासा मिळालाय.

शहापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे पाणीपातळीत वाढ झाली, तर सर्वात आधी तानसा धरण ओव्हर फ्लो झालं होतं. त्यानंतर मोडकसागर, वैतरणा आणि भातसा ही धरणं ओसांडून वाहू लागली होती. सध्या या चारही धरणांतून विसर्ग सुरू आहे, तर नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. मागील वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे मुंबईकरांना पाणीसंकटाचा सामना करावा लागला होता. यंदा मात्र, ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला पाणीसाठे पूर्णपणे भरले असल्याचं समोर आलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT