मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी आणि दळवळण यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी एमएमआरडीए (MMRDA) कडून मोठी पावले उचलली जात आहेत. येत्या वर्षभरात मुंबई आणि उपनगरांमध्ये सुमारे ९२ किमी लांबीच्या ४ नवीन मेट्रो मार्गिकांची कामे सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी...वर्षभरात 92 किमीच्या नव्या मेट्रोची कामं सुरू होणारेत. मुंबई महानगरातील दळवळणाला बळकटी देण्यासाठी 4 नव्या मेट्रो मार्गिकांचं काम MMRDAनं हाती घेतलंय. त्यामध्ये भिवंडी कल्याण मेट्रो ५ मार्गिकेचा दुसरा टप्पा, तसेच मिरा भाईंदर ते वसई विरार मेट्रो 13, कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो 14 मार्गिकेचा समावेशये...
मेट्रो ५ (दुसरा टप्पा): भिवंडी ते कल्याण दरम्यानचा महत्त्वाचा टप्पा.
मेट्रो १३: मिरा भाईंदर ते वसई विरार दरम्यानची जोडणी.
मेट्रो १४: कांजूरमार्ग ते थेट बदलापूरपर्यंतचा प्रवास सुकर होणार.
मेट्रो १०: गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) मार्गाचेही नियोजन.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.