यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईहून कोकणात जलमार्गे प्रवास करण्याची शक्यता आहे. सर्व नियोजन वेळेत आणि यशस्वीपणे पार पडल्यास मुंबई ते रत्नागिरी दरम्यान रो-रो सेवा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे महामार्गांवरील वाहतूक कोंडी आणि प्रवासातील वेळ यामुळे नागरिक त्रस्त होतात. अशावेळी जलमार्ग हा एक पर्यायी आणि सुलभ मार्ग ठरू शकतो.
नितेश राणे यांनी सांगितले की, “रो-रो सेवा सुरू करण्यासाठी अंतिम टप्प्यातील चर्चा सुरू असून, गणेशोत्सवाच्या आधी ही सेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.”या सेवेमुळे मुंबईकरांना गर्दीपासून मुक्त आणि जलद प्रवासाचा अनुभव घेता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. रो-रो सेवेअंतर्गत प्रवासी वाहने आणि कारदेखील बोटीवरून कोकणात पोहोचू शकतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.