Sanjay Raut News SaamTv
Video

MP Sanjay Raut PC News : कोल्हापूरच्या जागेवरून मविआमध्ये वाद? राऊतांनी व्यक्त केली खंत, म्हणाले.. | VIDEO

Kolhapur Assembly Constituency News : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून मविआमध्ये वाद असल्याचं संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. या जागेसाठी ठाकरे गट आग्रही होता, मात्र कॉंग्रेसने जागा दिली नाही, असं राऊत यांनी म्हंटलं आहे.

Saam Tv

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून पाठिंबा मिळवण्यासाठी राजेश लाटकर हे आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राजेश लाटकर हे अपक्ष निवडणुकीच्या मैदानात आहेत. कॉंग्रेस नेते सतेज पाटील आमच्या सोबत असल्याचं देखील राजेश लाटकर यांनी म्हंटलं आहे.

दरम्यान, ही जागा शिवसेनेने सात वेळा जिंकली आहे, मात्र कॉंग्रेसने ही जागा आम्हाला सोडली नाही, हे दुर्दैव असल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही खंत व्यक्त केली. 'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पोटनिवडणुकीत ही जागा दिली होती. त्यानंतर निवडणुकीची जागा आम्हाला द्या असं आम्ही सांगितलं होतं. मात्र काँग्रेसने जागा आम्हाला दिली नाही, हे दुर्दैव आहे. मी स्वतः कोल्हापूर उत्तरच्या जागेसाठी आग्रही होतो. आज त्या जागेत गोंधळ निर्माण झाले आहे. आम्ही महाराष्ट्राचे खंदे समर्थक आहोत. महाविकास आघाडीला तडा जाईल असे आम्ही काहीच करणार नाही, आम्ही महाविकास आघाडीशी कायम प्रामाणिक आहोत', असं देखील यावेळी बोलताना राऊत यांनी म्हंटलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coolie vs War 2: रजनीकांतच्या 'कुली' आणि हृतिक रोशनच्या 'वॉर २'मध्ये चढोओढ; तिसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

Crime: तरुणाकडून वयोवृद्ध आईवर दोनदा बलात्कार, आधी बेदम मारहाण नंतर...; म्हणाला - 'ही तुझ्या कर्माची शिक्षा'

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

'युतीचं डोक्यातून काढून टाका'; महायुतीत अलबेल नाही? अजित पवार गटाचे खासदार असं का म्हणाले?

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

SCROLL FOR NEXT