राज्यात अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसान भरपाईच्या विषयाला बगल देत या मंत्री महोदयांनी शेतकाऱ्यांनाच खडेबोल सुनावले होते. यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांसह सर्वच नेत्यांनी कोकाटेंचे कान टोचले. यानंतर अखेर आज रामनवमीनिमित्त नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतल्या नंतर कोकाटेंनी शेतकऱ्यांची माफी मागितली. ते म्हणाले, शेतकऱ्यांची अनावधानाने आणि मस्करीने कुस्ती झाल्याने अस वक्तव्य केल्याचे कोकाटे म्हणाले. शेतकऱ्यांचा मान सन्मान दुखवला गेला असेल, भावना दुखवल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. असे कोकाटे म्हणाले. गेले आठ दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई शासनाकडून दिली जाईल असे कोकाटे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.