आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथील आंदोलनाची तयारीसाठी आज मराठा समाज बांधवांची पंढरपुरात बैठक झाली. पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यातून सुमारे दीड हजार गाड्या मुंबईला जाणार आहेत. तर सोलापूर जिल्ह्यातून सर्वाधिक २५ हजार गाड्या मुंबईला जाणार आहेत, अशी माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी दिली आहे.
दरम्यान, मुंबईला जाण्यापूर्वी बीडमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची मांजरसुंब येथे अंतिम निर्णायक सभा होणार आहे. मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी २९ तारखेला मनोज जरांगे पाटील मुंबईत येणार आहेत. मुंबईत येण्यापूर्वी बीडच्या मांजरसुंबा परिसरात आज मनोज जरांगे पाटील यांची अंतिम निर्णायक इशारा बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीतून मनोज जरांगे राज्य सरकारला अंतिम इशारा देणार आहेत.ते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.