मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप करत आपल्याला दिलेले पोलीस संरक्षण नाकारले आहे. माझ्या घातपाताचा कट रचणाऱ्या मुख्य सूत्रधारालाच सरकार वाचवत आहे असे सांगत त्यांनी आपलं संरक्षण काढून घेण्याची मागणी केली. धनंजय मुंडे हेच या कटाचे मुख्य सूत्रधार असून, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस त्यांना वाचवत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. वाह रे सरकार, तुमच्या नाकीनऊ नाही आणले तर माझं नाव बदलून ठेवा, अशा शब्दांत त्यांनी सरकारला थेट आव्हान दिले. आता पोलीस संरक्षण नसल्याने मैदान मोकळे आहे आणि जे कोणी येतील त्यांना सामोरे जाऊ, असेही ते म्हणाले. संतोष देशमुख खून प्रकरणाचा उल्लेख करत, त्यातील मुख्य आरोपीला वाचवले जात असल्याचा दावाही त्यांनी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.