राज्यात सध्या ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळतोय. एका बाजुला पावसाचं सावट, तर दुसरीकडे उष्णतेची लाट आहे. हवामान विभागानं कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा 'येलो अलर्ट' जारी केला आहे. मुंबईसह, पालघरमध्येही कमालीचा उकाडा जाणावणार आहे.सांगली, सातारा, लातूर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा दिलाय. तर उर्वरित महाराष्ट्रात उन्हाचा चटका कायम राहणार असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलंय. एकीकडे नागरिकांना उन्हाळ्या झळा सोसाव्या लागत आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट
सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर
या जिल्ह्यांना उष्ण लाटेचा इशारा
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.