Video

Uddhav Thackeray: सरकारने स्वत:च्या हाताने लोकशाहीला काळीमा फासला; उद्धव ठाकरे कडाडले

Maharashtra Janakrosh Andolan: महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलनादरम्यान उद्धव ठाकरे यांनी केंद्रावर लोकशाही चिरडल्याचा आरोप केला. भ्रष्ट महायुती मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली.

Bharat Jadhav

  • अंधारे चौकात महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन पार पडले.

  • उद्धव ठाकरेंनी केंद्रावर लोकशाही चेपल्याचा आरोप केला.

  • महायुतीतील कलंकीत मंत्र्यांची हकालपट्टीची मागणी.

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आंदोलन आयोजित केले.

सरकारला जाब विचारण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो. पण लोकशाहीची लढाई सरकार चेपून टाकत आहे. सरकारने स्वत:च्या हाताने लोकशाहीला काळीमा फासलाय, अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. मंत्र्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, या मागणीसाठी आज शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अंधारे चौकात महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं त्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत केंद्र सरकारवर निशाणा साधला. मत चोरी बाबतचा मुद्दा सर्व देशभरात लागून धरला पाहिजे. कारण तो लोकशाहीचा मुद्दा आहे. लोकसभा निवडणुकीच्या त्यांनी मतांची चोरी केली. महाराष्ट्रात विधानसभेला सुद्धा मतांची चोरी झाली. सहा महिन्यात महाराष्ट्रात ४५ लाख मते वाढली असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa T20 WC: दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली; 111 धावांवर अख्खा संघ All Out

Monday Horoscope : थकवा, चिडचिड आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा; ५ राशींच्या लोकांनी वाणीवर संयम ठेवा,अन्यथा...

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

SCROLL FOR NEXT