राज्यात सध्या पावसातं थैमान सुरु असून मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. रविवारपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ४ जणांचा बळी गेला असून, मराठवाड्याला सर्वाधिक फटका बसला आहे. सोमवारी तब्बल १३ जिल्ह्यांतील १६६ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अचानक वाढलेल्या पावसामुळे नद्या-नाले तुडुंब भरले असून खालच्या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस राज्यात सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.